Header Ads Widget

शरद पवार थेट शेतकऱ्यांच्या बांधावर | आता तरी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार का?

 

शरद पवार थेट शेतकऱ्यांच्या बांधावर | नुकसान भरपाई देणार का?

आज राष्ट्रवादी काँग्रेस चे सर्वेसर्वा शरद पवार यांनी तुळजापूर परिसरातील काक्रंबावाडी, लोहारातील सास्तुर, राजेगांव, उमरग्यातील कवठा, औसा तालुक्यातील उजनी, उस्मानाबादमधील पाटोदा, करजखेडा या गावांना भेटी देऊन अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी गावकऱ्यांशी संवाद साधला.

एखाद्यावेळी अतिवृष्टी, दुष्काळ, रोगराई येते तेव्हा पीक जातं, पण ते त्यावर्षीचं पीक जातं. पण यावेळचं जे संकट आहे त्यामुळे जमिनीची जी अवस्था झालेली आहे त्यात त्यावर्षीचंच पीक नाही तर पुढची काही वर्षे पीकच घेता येत नाही. आतिवृष्टीचे हे संकट संपूर्ण शेतीव्यवस्था आणि अर्थव्यवस्था उद्धवस्त करणारे संकट आहे .

जमीन खरवडून गेली. त्यामुळे या नुकसानाचे स्वरूप हे नेहमीपेक्षा मोठे आहे. याशिवाय काही ठिकाणी कुणाच्या विहिरी होत्या, कुणाच्या पाईपलाइन होत्या, कुणी ठिबक सिंचन व्यवस्था केली होती. अन्य काही साधनं होती, तीदेखील वाहून गेली. घरातील समानसुमानसुद्धा वाहून गेलं. या परिस्थितीतून आपल्याला काही ना काही तरी मार्ग काढावा लागेल असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना सरकारच्या मदतीची खूप गरज आहे, आपण राज्य सरकार आणि केंद्र सरकारशी बोलू. एकंदर नुकसानाचे स्वरूप पाहिलं तर या सर्व परिस्थितीला एकटे राज्य सरकार तोंड देऊ शकणार नाही असं मला वाटतं. याठिकाणी केंद्राकडून मदत मिळालीच पाहिजे. आपण आपल्या लोकप्रतिनिधींना घेऊन राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाच्या संबंधित प्रतिनिधींशी बोलू असे देखील पवारांनी म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments